समाजचिंतन
नरहर कुरुंदकर हे मराठी भाषा व साहित्याचे समीक्षक, आणि समाजचिंतक होते. ते एक प्रभावी वक्ते होते. त्यांना भेटलेल्या, सहवास लाभलेल्यांचे व्यक्तिचित्रणे "निवडक नरहर कुरुंदकर खंड एक व्यक्तिवेध" मध्ये प्रकाशित झाली आहेत. त्यातील काही उतारे व सहसंबंध (correlations ) हैद्राबाद संस्थानांमधील पहिल्या १९५२ च्या निवणुकीतील निरीक्षणं. "नेतेमंडळी आपल्या वैयक्तिक जीवनात गरजेनुसार लबाड्या करणारी क्षुद्र माणसेच आहेत. .भव्यता, दिव्यता हेच या व्यक्तीचे स्वाभाविक रूप आहे असे उगीच गृहीत धरून चाललो होतो. त्या व्यक्ती खरोखरी फार सामान्य आणि क्षुद्र आहेत. हे या निवडणुकीत अतिशय दुःखाने जाणून घेणे मला भाग पडले" आचार्य कुरुंदकरांचे वरील अनुभव, सामवेदी ब्राहमण संघ प्रतिनिधी मंडळाच्या निवडणुकीशी (correlate) जोडून बघा. अनुभव फारसा वेगळा नाही. आदरणीय यदुनाथ थत्ते विषयी लिहिताना कुरुंदकर म्हणतात. "यदुनाथांनीच असं म्हटलं आहे की संस्था ध्येयवादासाठी उभ्या करायच्या असतात. कधी वेळ अशी येते की ध्येयवाद जतन करण्यासाठी संस्थांचे आस्तित्व धोक्यात घालावे लागते अश्या निर्णयप्रसंगी ध्येय