Posts

Showing posts from May, 2022

समाजचिंतन

 नरहर कुरुंदकर हे मराठी भाषा व साहित्याचे समीक्षक, आणि समाजचिंतक होते. ते एक प्रभावी वक्ते होते. त्यांना  भेटलेल्या, सहवास लाभलेल्यांचे  व्यक्तिचित्रणे   "निवडक नरहर कुरुंदकर  खंड एक  व्यक्तिवेध"  मध्ये प्रकाशित झाली आहेत. त्यातील काही उतारे व सहसंबंध (correlations  ) हैद्राबाद संस्थानांमधील पहिल्या १९५२ च्या निवणुकीतील  निरीक्षणं.  "नेतेमंडळी आपल्या वैयक्तिक जीवनात गरजेनुसार लबाड्या करणारी क्षुद्र माणसेच आहेत.  .भव्यता, दिव्यता  हेच या व्यक्तीचे स्वाभाविक रूप आहे असे उगीच गृहीत धरून चाललो होतो. त्या व्यक्ती खरोखरी फार सामान्य आणि क्षुद्र आहेत. हे या निवडणुकीत अतिशय दुःखाने जाणून घेणे मला भाग पडले" आचार्य कुरुंदकरांचे वरील अनुभव, सामवेदी ब्राहमण संघ प्रतिनिधी मंडळाच्या निवडणुकीशी (correlate) जोडून बघा. अनुभव फारसा वेगळा नाही.  आदरणीय यदुनाथ थत्ते विषयी लिहिताना कुरुंदकर म्हणतात.  "यदुनाथांनीच असं म्हटलं आहे की संस्था ध्येयवादासाठी उभ्या करायच्या असतात. कधी वेळ अशी येते की ध्येयवाद जतन करण्यासाठी संस्थांचे आस्तित्...

प्रतिनिधी मंडळ निवडणुकीचं कवित्त्व

 सामवेदी ब्राह्मण संघ प्रतिनिधी मंडळ निवडणुकीचं कवित्त्व काही दिवस उरेल.  आपण सर्व विसरून जाऊ. विसरणे हे वरदान आहे. कधी तुम्ही विसरता, परंतु तल्लख बुद्धी वाले विसरता विसरणार  नाहीत. त्यांना तिथेच खितपत राहू दे.  मती गुंग झालेले बारामती आणतील , नागपूर आणतील. नेमक्या प्रश्नावर बोलता/लिहता येत नाही तेव्हा अश्या गोष्टी मध्ये आणतील. आणू दे त्यांना .  बिच्चारे! इतिहासा पासून काही शिकत नाही. परंतु एक वाक्य आठवणीत असेल  "बचेंगे तो और भी लढेंगे "  हे ध्यान्यात असणा-यांनी असलेल्या प्रतिनिधींना विवेके मतदान करावे असं आवाहन करणे योग्य की अयोग्य,  कोण कोणाला शिव्या देतो आहे.  चुकीच्या ओव्या सुद्धा  शिव्या होतात.  कार्याचं मूल्यमापन होऊ नये का? इकडेच तर खरी कसोटी असते.  जैमुनीवर आता कोणी जायला, काम करायला तयार होत नाही असा सूर काढला जातो. जरा विश्लेषण करा !  दहा वर्षापूर्वी खूप मंडळी जैमुनी संचालक मंडळात जाण्यासाठी उत्सुक असायची. कोणी आणली ही परिस्थिती,काय झालं, कश्यामुळे झालं  विचार कराल की नाही?  काम करण्यायोग्य वातावरण , सं...

पाय मातीचे .... डोकं .....

सामवेदी ब्राह्मण संघ प्रतिनिधी मंडळ , अध्यक्ष , पदाधिकारी निवडणूक झाली. आता काही दिवस कवित्व राहील.  नवीन प्रतिनिधी मंडळाला, विधायक कामासाठी मनःपूर्वक शुभेच्छा !! या निवड प्रक्रियेत  काही अपसमज , गैरसमज , पसरविले गेले. त्यातील महत्वाचा  संजीवनी परिवाराने निवडणूक प्रतिष्ठेची केली.   संजीवनी परिवाराने  निवडणूक प्रक्रियेत भाग घेतला नव्हता. दुस-या संस्थेच्या निवडणुकीत संजीवनी म्हणून भाग घेणे  गैर आहे. म्हणून संजीवनी परिवार अलिप्त होता. व्यक्तिगत पातळीवर सदस्यांना भाग घेण्याची मुभा होती.  संजीवनी परिवाराचे  काही सदस्य  निवडणूक प्रक्रियेत सक्रिय होते. जे सदस्य सक्रिय होते ते साब्रा संघ प्रतिनिधी मंडळाचे सदस्य होते.  ज्यांना भेदाभेद दाखवायची होती त्यांनी इंग्रजांची नीती वापरली असो.   निवडणूक प्रक्रिया, निरीक्षणं  आपली संस्था सामाजिक कमी आणि राजकीय जास्त झाली आहे . निवडणुकीत  राजकीय डावपेच, दिलेला शब्द पाळण्यासाठी नसतोच ही नेतृत्वाची मानसिकता, असे अनेक रंग दिसले, रंग इतके काळे गडद होते कि न बोललेलं बरं.   एकवचन...

व्यक्तींचिंतन

  नरहर कुरुंदकर   हे मराठी भाषा व साहित्याचे समीक्षक, आणि समाजचिंतक होते. ते एक प्रभावी वक्ते होते.  त्यांना  भेटलेल्या, सहवास लाभलेल्यांचे  व्यक्तिचित्रणे   "निवडक नरहर कुरुंदकर  खंड एक  व्यक्तिवेध"  मध्ये प्रकाशित झाली आहेत. त्यातील काही उतारे व सहसंबंध (correlations  ) हैद्राबाद संस्थानांमधील पहिल्या १९५२ च्या निवणुकीतील  निरीक्षणं.  "नेतेमंडळी आपल्या वैयक्तिक जीवनात गरजेनुसार लबाड्या करणारी क्षुद्र माणसेच आहेत.  .भव्यता, दिव्यता  हेच या व्यक्तीचे स्वाभाविक रूप आहे असे उगीच गृहीत धरून चाललो होतो. त्या व्यक्ती खरोखरी फार सामान्य आणि क्षुद्र आहेत. हे या निवडणुकीत अतिशय दुःखाने जाणून घेणे मला भाग पडले" आचार्य कुरुंदकरांचे वरील अनुभव, सामवेदी ब्राहमण संघ प्रतिनिधी मंडळाच्या निवडणुकीशी (correlate) जोडून बघा. अनुभव फारसा वेगळा नाही.  आदरणीय यदुनाथ थत्ते विषयी लिहिताना कुरुंदकर म्हणतात.   " यदुनाथांनीच असं म्हटलं आहे की संस्था ध्येयवादासाठी उभ्या करायच्या असतात. कधी वेळ अशी येते की ध्येयवाद ज...